अळूवडी

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारणContinue reading “अळूवडी”

दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”

सुशीला

तांदूळ हे धान्य असं आहे की किती तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या रोजच्या खाण्यात आपण त्याचा वापर करत असतो. पोहे तांदळाचेच असतात, इडली, दोसे तांदळासहच बनतात. तांदळाच्या शेवयांचा उपमा केला जातो. भाताचे तर कितीतरी प्रकार करता येतात. तांदूळ हे जगातलं सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं कर्बोदक (कार्बोहायड्रेट) आहे. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये या ना त्या स्वरूपात तांदूळ खाल्लाContinue reading “सुशीला”

उंबरांची आमटी

मराठवाड्यात ब्राह्मणसदृश जातींमध्ये पूर्वी मांसाहाराचं प्रमाण नगण्य होतं. मांसाहार हा प्रथिनांची गरज पूर्ण करणारा मोठा आणि महत्त्वाचा स्त्रोत आहे. शिवाय मराठवाड्यात वरण फक्त तुरीच्या डाळीचं केलं जायचं आणि तेही खूप पातळ अगदी रस्समसारखं. उडदाची डाळही फार कमी वापरली जायची. मग प्रथिनांची गरज भागवण्याकरता भाजीत, आमटीत चणा डाळीच्या पिठाचे गोळे किंवा उंबरं सोडण्याची प्रथा आली असावी.Continue reading “उंबरांची आमटी”

भरलेले कांदे

कांद्याशिवाय भारतीय स्वयंपाकाचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याकडे जवळपास ७०-८० टक्के भाज्यांमध्ये फोडणीला कांदा घातला जातो. शिवाय कालवणं, मांसाहारी पदार्थ यांनाही कांदा हवाच. कांद्याची पीठ पेरून भाजी, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचं रायतं असे किती तरी पदार्थ रोजच्या जेवणात आपण करत असतो. कांदा-मिरची घातलेलं चमचमीत ऑम्लेट काय मस्त लागतं! कच्चा कांदा नसेल तर भेळ, पाव-भाजी, रगडाContinue reading “भरलेले कांदे”

प्रसादाचे दहा पदार्थ

गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात.Continue reading “प्रसादाचे दहा पदार्थ”

पुरणपोळी

आज होळी आहे. अर्थातच पुरणपोळीचा दिवस! मला फार कमी गोड पदार्थ मनापासून आवडतात, त्यातली एक पुरणपोळी आहे. लहान असताना आजी जेव्हा सणांना पुरणपोळ्या करायची तेव्हा लहान लहान वाट्यांमध्ये ताजं कढवलेलं तूप वाढायची. त्या तुपात भिजवलेली पुरणपोळी काय अफलातून लागायची! मला घरीच कढवलेलं तूप आवडतं विकतचं आवडत नाही हे आजी जाईपर्यंत म्हणजे तिच्या वयाच्या चौ-याण्णव्या वर्षापर्यंतContinue reading “पुरणपोळी”

उंधियो

प्रत्येक प्रांतात एक तरी पारंपरिक मिश्र भाजी केली जाते. म्हणजे बघा ना, आपली भोगीची भाजी असते, दक्षिणेत अवियल केलं जातं, तर गुजरातेत उंधियो. शिवाय आपल्याकडे केली जाणारी ऋषीपंचमीची भाजी असो की सारस्वतांमध्ये केल्या जाणा-या कंदमूळ, खतं या भाज्या असोत. १९८९ मध्ये आम्ही गुजरातच्या सहलीवर गेलो होतो. तेव्हाही गुजरातमधले रस्ते अतिशय चांगले होते. बाबा तेव्हा उच्चContinue reading “उंधियो”